शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नदीकाठची संपूर्ण शेतजमीन झाली जिरायत... मिरज तालुक्यातील प्रकार : शेतकरी संघटनेकडून अजब प्रकार उजेडात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 21:11 IST

सांगली : नदीकाठच्या बागायत जमिनींची नोंद जिरायत करून शेतकºयांचे आर्थिक नुकसान करण्याचा प्रकार शेतकरी संघटनेमार्फत नुकताच उजेडात आला.

ठळक मुद्देकोणत्याही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेल्या नाहीतपाटबंधारे विभागास नुकसानभरपाईचा प्रस्ताव तयार करण्यास भाग पाडले

सांगली : नदीकाठच्या बागायत जमिनींची नोंद जिरायत करून शेतकºयांचे आर्थिक नुकसान करण्याचा प्रकार शेतकरी संघटनेमार्फत नुकताच उजेडात आला. संपूर्ण मिरज तालुक्यातील नदीकाठच्या सर्व गावांच्या जमिनींच्या सात-बाराला जिरायत नोंद झाली आहे. त्यामुळे आजवर शेतकºयांची यामाध्यमातून मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी यासंदर्भात शनिवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले की, पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी कसबे डिग्रज येथील शेतकरी अशोक रामू तोडकर व बाळासाहेब यशवंत पाटील या दोन शेतकºयांची अनुक्रमे ३८ गुंठे व १५ गुंठे कृष्णा नदीकाठची शेतजमीन २००७ मध्ये अधिग्रहित करण्यात आली. आजअखेर या दोन्ही शेतकºयांना त्याची नुकसानभरपाई मिळाली नव्हती. या शेतकºयांनी शेतकरी संघटनेकडे याबाबतचे गाºहाणे मांडले. त्यानंतर याबाबतचा पाठपुरावा करून पाटबंधारे विभागास नुकसानभरपाईचा प्रस्ताव तयार करण्यास भाग पाडले. मात्र पाटबंधारे विभागाने शेतजमिनीचे मूल्यांकन ५० टक्के कमी दाखविले.

मूल्यांकनाबाबत तहसीलदारांशी संपर्क साधून विचारणा करण्यात आल्यानंतर एक धक्कादायक प्रकार उजेडात आला. संपूर्ण मिरज तालुकाच आॅनलाईन सात-बारावर जिरायत झाल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत अनेक अडचणी येत असल्याने पंधरा दिवसात याबाबतची दुरुस्ती होईल, असे आश्वासन दिले. याप्रकरणी सखोल चौकशी केली असता, पूरसंरक्षक भिंत बांधताना कोणत्याही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेल्या नाहीत. आजही संबंधित जमिनींच्या सात-बारा उताºयावर शेतकºयांचेच नाव दिसते. इतर हक्कांमध्येही कोणतीच नोंद नाही. तरीही शासकीय निधी खर्च करून मोठा गुन्हा करण्यात आला आहे. महाराष्टÑातील असे अनेक प्रकल्प जमिनी ताब्यात न घेता बेकायदेशीरपणे पूर्ण करण्यात आल्याचा आमचा दावा आहे. यावेळी कोले यांच्यासोबत सुनील फराटे, रावसाहेब दळवी, बाळासाहेब पाटील, आण्णासाहेब पाटील, अशोक चौगुले, अशोक तोडकर, वसंतराव भिसे, शंकर तपासे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणारकोले म्हणाले की, यासदंर्भात पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे आम्ही तक्रार केली आहे. लवकरच आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तक्रार करुन संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करणार आहोत. शेवटपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा केल जाईल.

अन्यत्र शोधाशोधसांगली जिल्ह्यातील अन्य काही तालुक्यांमध्ये असे काही प्रकार झाले आहेत का, याचा शोध आता संघटनेमार्फत सुरू झाला आहे. त्याबाबतची माहिती संकलित केली जात आहे.

टॅग्स :WaterपाणीSangliसांगली